🔱आज १७ जून🚩राजमाता जिजाऊ स्मृतिदिन🚩
जिजाबाई राजमाता जिजाऊ १७ जून १५९८ ते १७ जून १६७४ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
भोसले व जाधवांचे वैर: पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ.दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
जिजाबाईंची अपत्ये: जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली, चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
राजांचे संगोपन आणि कुशल कारभार: शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली.अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले.निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले.जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले.शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले.
शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
जीवन: शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकरयांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले, या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.
तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा!
🚩🔴शिवगीत🔴🚩
जिजाऊच्या सुता तुला
महादेवाचे वरदान….
एक मुखाने बोला
बोला जय जय शिवराय….
दिव्य तुझी शिवभक्ति
दिव्य तुझी काया….
बालपणी गेलासी तु
तोरणा जिंकाया….
हादरले मोघल थरथरले आसमान
एक मुखाने बोला
बोला जय जय शिवराय….
मुरारबाजीला आली मूर्छा लागुनीया बाणं….
दिल्ली साठी शिवा
तु केले प्रयाण….
तळहातावर देवुन तुरी
घेवुनी आला पंचप्राण….
एक मुखाने बोला
बोला जय जय शिवराय….
शायीस्तेखानाचे शोधासाठी गाठलास लालमहालं….
तिथे तलवारीचा
तु वाजविला डंका….
मोगल खवळले सारे
परी हसले पठाण….
एक मुखाने बोला
बोला जय जय शिवराय…
हार तुला राज्यभिषेकाचा जिजाऊनी घातला….
पाहीलेस फोडुन मोती
शिव कुठे आतला….
उघडुनी निधडी छाती
दाखविले शिवराज्य….
एक मुखाने बोला
बोला जय जय शिवराय….!
पन्हाळ गडाच्या वेडया मध्ये सापडलास शिवा….
परी बाजीच्या पराक्रमाने
तोडलास वेडा….
निष्ठुनी पन्हाळगड गाठला विशाळगड….
एक मुखाने बोला
बोला जय जय शिवराय….
तुझ्या भेटीसाठी
अफजलखान आला….
प्रतापगडाच्या पायथ्याशी
कसा त्याला गाडला….
पाहुनी तुझा पराक्रम हादरला औरंगजेब….
एक मुखाने बोला
बोला जय जय शिवराय….
आले किती गेले किती
संपला भरारा….
तुझ्या परि नावाचा रे
अजुनी दरारा….
धावत ये लवकरी
आम्ही झालो रे हैराण….
एक मुखाने बोला
बोला जय जय शिवराय….
धन्य तुझे शिवराज्यं….
धन्य तुझी किर्ती….
तुझे भक्त आम्ही सारे
विस्कटलो का शिवा….
धावत ये विरमराठा
करूनी एकजुठ….
एक मुखाने बोला
बोला जय जय शिवराय….!
स्वराज्य संकल्पनेचे बीज राजमाता जिजाऊ यांनी बालपणीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवले. छत्रपती शिवरायांना धर्मरक्षण, स्त्रियांचा मान-सन्मान, न्यायनिवाडा, रयतेचे हित, स्वराज्यनिष्ठेची कास धरायला लावणाऱ्या जिजाऊंसारख्या कणखर, विवेकी माता स्त्रीशक्तीचे आदर्श उदाहरण आहेत. समाजाला दिशा देणाऱ्या वंदनीय व्यक्तींच्या स्मृती आपल्याला सातत्याने प्रेरणा देत असतात. आज राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या योगदानाचे, कार्याचे स्मरण ठेवूया आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करुया…🙏🌹
ll🚩🔱जय जिजाऊ🔱🚩ll
ll🚩🔱जय शिवराय🔱🚩ll
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply