आज ८ जुलै:ऐतिहासिक उडीची शताब्दीपुर्ती!
“स्वातंत्र्यवीर सावरकरांची जहाजातून ↕️घेतलेली उडी”
भाग👇१.
ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये बोटीतून उडी घेतली.
त्या ऐतिहासिक घटनेला आज १०० वर्षं पूर्ण होत आहेत. त्रिखंडात गाजलेल्या या उडीच्या शताब्दीनिमित्ताने मार्सेलिस येथे खास समारंभसुद्धा होणार आहे…..विश्वास सावरकर,स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचे पुत्रमासेर्लिस बंदरामध्ये दि. ७ जुलै १९१०च्या रात्री ‘मोरया’ बोट थांबली आणि दि.८ जुलै १९१० या दिवशी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बोटीच्या पोर्टहोलमधून त्रिखंडात गाजलेली उडी मारली आणि इंग्रजांच्या हातून निसटून जाण्याचा धाडसी प्रयत्न केला.आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे फ्रान्सच्या किनाऱ्यावर प्रवेश केला की ती व्यक्ती त्या देशाची नागरिक ठरते आणि अन्य देशांच्या सरकारला, त्या नागरिकाला विनापरवाना ताब्यात घेता येत नसे.या कायद्याचा लाभ उठवण्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रयत्न केला.पूर्वसूचनेप्रमाणे मादाम कामा, लाला हरदयाळ हे मासेर्लिस बंदरावर येण्याचे ठरले होते; पण दुदैर्वाने त्यांना येण्यास थोडा उशीर झाला आणि ब्रिटिश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना लाच देऊन सावरकरांना ताब्यात घेऊन बोटीवर आणले.पुढे ‘हेग’ येथील आंतरदेशीय न्यायालयात खटला भरवून सावरकरांना सोडविण्याचा मादाम कामा,डॉ.राणा आदींनी प्रयत्न केला;परंतु ब्रिटनच्या फ्रान्सवरील दबावामुळे ‘हेग’च्या न्यायालयाने सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध युरोपातील स्वतंत्र देशांतील वृत्तपत्रांनी लेख लिहून तीव्र निषेध केला.हिंदी क्रांतिकारकांनीही त्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त करून ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्याचा निश्चय केला. संपूर्ण जगातील देशांमध्येही ‘हेग’च्या निर्णयाविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त केला गेला.या घटनेला दि.१० जुलै २०१० या दिवशी १०० वर्षे पूर्ण होतील.हा दिवस फ्रान्समध्येही साजरा करण्यासाठी भारतीय लोकांनी प्रयत्न केला आणि फ्रान्सच्या शासनाने मासेर्लिसच्या समुदकिनारी स्तंभ उभारण्याचे मान्य करून त्यासाठी जागा देण्याचेही मान्य केले. केवळ आंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे, भारतीय शासनाच्या परराष्ट्रीय खात्यातून या स्मारकास संमतीदर्शक पत्र फ्रान्स शासनाकडे पाठवावे अशी सूचना करण्यात आली;परंतु भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन केंद शासनाने,केलेली ही सूचना हेतूत: दुर्लक्षित करून तसे पत्र फ्रेंच सरकारकडे धाडले नाही. तसे पत्र धाडण्यासाठी खासदार, आमदारांनी भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून,आपले लेखी विनंतीपत्र सादर करावे, अशी विनंती केली,तरीही भारतीय शासनाने आपले संमतीपत्र फ्रेंच शासनाकडे पाठवले नाही.शासनाच्या या उदासीन वृत्तीचा जनतेने निंदाजनक भाषेने व लेखांद्वारे विरोध केला आणि जनताच मासेर्लिसच्या समुदकिनाऱ्यावर हे शताब्दी वर्ष साजरे करील व शासनाला तशी संमती देण्यास भाग पाडेल अशी आशा निर्माण केली.यानंतर भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद शासनाने यासंबंधी फ्रेंच सरकारला ‘विना हरकत पत्र’ धाडण्यात अनिच्छा व्यक्त केली.पुढे काँग्रेसच्या डॉ.मनमोहन सिंग शासनानेही तशा अर्थाचे पत्र फ्रेंच शासनाला पाठवण्यास मनाई केली.अशा परिस्थितीत सावरकरनिष्ठ संस्थांनी पुढाकार घेऊन हा शतकमहोत्सवी दिन फ्रान्सच्या मासेर्लिसच्या किनाऱ्यावरील फ्रेंच शासनाने बहाल केलेल्या भूभागावर साजरा करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तिथे सभा, सावरकरांची पदे, पोवाडे व कवितांचे गायन आदी कार्यक्रम करण्याचे निश्चित केले आहे.तसेच प्रामुख्याने मुंबईतील विलेपालेर् येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद’, ‘राजाराणी ट्रॅव्हल्स लिमिटेड, मुंबई’, ‘आदित्य प्रतिष्ठान, पुणे’ अशा संस्थांनी पुढाकार घेऊन हा शताब्दीदिन साजरा करण्याचे निश्चित केले आहे.राजाराणी ट्रॅव्हल्सने तर युरोपची यात्रा करण्याचा कार्यक्रम योजून मासेर्लिस किनाऱ्यावर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी तेथे प्रवाशांना घेऊन जाण्याचे निश्चित केले आहे.त्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी प्रवचनकार,गायक,वक्ते आदी व्यक्तींनी शताब्दी उत्सवाला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. खास विमानातून ते फ्रान्सच्या शताब्दी उत्सवाला आवर्जून आपले सहकार्य करणार आहेत.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राजकीय, सामाजिक चळवळीतले यश हे प्रथम होणाऱ्या शासकीय विरोधाला विरोधून प्रत्यक्ष आंदोलने करूनच मिळवले आहे.याचे कारण त्यांच्या दूरदृष्टीला जे अनिष्ट धोके दिसले ते सुस्पष्टपणे त्यांनी वेळोवेळी हिंदू समाजाला पूर्वसूचना देऊन सांगितले होते.सभा,संमेलनांतून त्यांनी प्रखर प्रचार केला आणि त्या धोक्यांच्या सूचनेप्रमाणे पुढे प्रत्यक्ष अनुभव आला,त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सूचना किती यथार्थ होत्या हे समाजाला कळून आले. पण तोवर उशीर झालेला होता.स्वा.वीर सावरकरांच्या जीवनातले यश,त्यांना भांडून,झगडून मिळाले आहे. मासेर्लिस येथे सागरात उडी घेऊन ब्रिटिशांच्या कैदेतून निसटण्याच्या सावरकरांच्या प्रयत्नानंतरही त्यांना पोलिसांचा आणि ब्रिटिश शासनाचा,तसेच समाजाचा कडवा विरोध सहन करावा लागला होता;परंतु कालांतराने या सागरी उडीचे महत्त्वही जनतेला उमजले आणि आता तर त्या घटनेला शंभर वषेर् पुरी झाल्यावर जनताच हा शंभरावा वर्षदिन साजरा करत आहे,याचा मला अतिशय अभिमान वाटत आहे.आपल्या हिताचा आणि राजकीय स्वास्थ्याचा,हिंदुत्वाचा नि हिंदू राष्ट्र रक्षणाचा विचार सावरकरांनी केलेल्या मार्गदर्शनाचे पालन करून सर्वांनी करावा. हिंदुहित आणि हिंदुराष्ट्राच्या हिताचेच राजकीय धोरण, राजकीय पक्ष आणि संस्था यांनी निश्चयाने अंगीकारले तर सावरकरांच्या मासेर्लिसला होणाऱ्या शताब्दी समारंभाचा हेतू पूर्ण होईल.मासेर्लिसच्या या शताब्दी दिन सोहळ्याला यश येवो अशी सदिच्छा आपण सारे वव्यक्त करूया.!
संदर्भ:गुगल/इंटरनेट_
संकलन:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


Leave a Reply