आज ५ जुलै:देवी रोगाचे भारतातून उच्चाटन:WHO ची घोषणा – बडगुजर. इन

आज ५ जुलै:देवी रोगाचे भारतातून उच्चाटन:WHO ची घोषणा.
देवी रोग हा एक रोग आहे.हा रोग वा रिओला नावाच्या विषणूंमुळे होतो.या रोगामुळे मज्जासंस्थेंला प्रादुर्भाव होतो.
या रोगाची लक्षणे:ताप आणि संसर्गा नंतर तीन ते चार दिवसात अंगावर पुरळ येतात.त्या पुरळामध्ये
पाण्यासारखा द्रव तयार होतो,त्यात पू होतो.रुग्णास वेदना होतात.गंभीर परिस्थितीत रुग्ण आंधळा होतो.रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या त्वचेवर खड्डे व चट्टे पडतात.ब्रिटिश डॉ.एडवर्ड जेन्नर यांनी देवी रोगावर लस शोधून काढली.एडवर्ड जेन्नर हे लस देऊन रोगा पासून मानवास वाचण्याच्या उपचार पद्धतीचे जनक आहेत.
४८ वर्षापूर्वी आजच्या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने(WHO)देवी या रोगाचे भारतातून उच्चाटन झाल्याचे जाहीर केले.
देवी रोगाचा इतिहास:
भारतात देवी रोग देवाचा कोप झाल्यावर होतो अशी मान्यता होती.देवी रोगाचे खूप खूप भय होते.देवी रोगावर लस,औषधे उपलब्ध नव्हते.१८ व्या शतकात युरोपात दरवर्षी चार लाख लोक मरण पावत आणि २५% लोक जे रोगातून वाचत ते आंधळे होत.

देवी या रोगाची पुरातन मान्यता: देवी रोग हा देवीच्या कोपा मुळे होतो अशी मान्यता होती त्यामुळे या रोगास देवी रोग हे नाव पडले.१९५० सालापर्यंत देवी या रोगाने जगभर ६० टक्के लोक मृत्युमुखी पडत होते. मरीआई आणि शितलादेवी यांच्या कोपाने हा रोग होतो असा त्या वेळच्या लोकांचा समज होता.देवी हा रोग अत्यंत भयंकर आणि वेदनादायी आहे.हा रोग देवीबाधित रुग्णाच्या संपर्काने अथवा त्याच्या वस्तू वापरल्याने होतो.हा एक विषाणूजन्य रोग आहे.
लक्षणे: रुग्णाला ताप येणे,थंडी वाजणे,स्नायू दुखी ही लक्षणे दिसून येतात.त्यानंतर त्वचेवर पुरळे येतात,पुरळ शरीरभर पसरतात. पुरळ यांमध्ये पाण्यासारखा द्रव होतो. १० ते १५ दिवसांनी पू भरतो,अंधत्व येते.नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होतो. शया अवस्थेत ७ ते ८ दिवसात मरण पावतो.

संशोधन कार्य: ब्रिटीश शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर याने या रोगापासून संपूर्ण जगाला मुक्त केले.त्याने १७९८ साली देवी या रोगावारची लस शोधून काढली.१९७५ मध्ये हा रोग भारतातून व १९८०मध्ये हा रोग जगातून नष्ट झाला.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*