११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस – बडगुजर. इन


११ मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे.’राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ साजरा केला जातो.या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली.हा दिवस इतिहासात १९९८ ला ‘पोखरण अणु चाचणी’ आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने,पोखरणमध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता,तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.

भारताचं आव्हान: अणूबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे कधी न संपणाऱ्या पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले.
जगाला धक्का: ११ मे १९९८ रोजी सकाळी वाळवंटातील पोखरणमधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली.व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला.५८ किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले.हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्‍या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता.भारताने हे काम कसे केले हे पाहून जगाला धक्का बसला.
अमेरिकेला चकवा: भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती.१९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली.त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही.कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली.लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले.परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.
हंसा-३: अणुचाचण्यांशिवाय भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा ३ या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली.
या व्यतिरिक्त भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) जमिमीवर हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं.हे सैन्य आणि नौदल यांनी एकत्रित केले आणि भारत मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग बनला.
🚀🛰️🛸⚓🛸🛰️🚀

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*