? पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उद्यापासून दहावीची परीक्षा होणार, जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा शेवटची संधी
? राज्यभरातील 4 हजार 874 केंद्रांवर परीक्षा होणार, संपूर्ण राज्यभरातून 17 लाख 813 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी, कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी 252 भरारी पथके असणार
? विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे :
▪ परीक्षा केंद्रात मोबाइल नेऊ नका
▪ विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा कक्षात उपस्थित राहणे आवश्यक
▪ दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिताना शाई बदल करू नका
▪ उत्तरपत्रिकांची पाने जपून हाताळा
▪ उत्तरपत्रिकांवर उत्तराशिवाय इतर कोणताही मजकूर लिहू नका
▪ चुकीच्या गोष्टी समोर आल्यास विद्यार्थ्यांची गंभीर चूक समजून त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असा परीक्षा मंडळातर्फे इशारा… सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. All the Best ?
- अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
- बडगुजर प्राऊड ग्रुप

Leave a Reply